मुंबई : सय्यद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेत मुंबईची विजयी घोडदौड कायम राहिली. मुंबईने तिसऱ्या सामन्यात मध्य प्रदेशवर ९ विकेटसनी मात करत सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली. वानखेडे स्टेडियमवरील या सामन्यात जय बिस्ता (६८) आणि आदित्य तरे (ना. ७४) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर मुंबईने १६० धावांचे लक्ष्य सहज पार केले. प्रथम फलंदाजी करताना मध्य प्रदेशने ५ बाद १५९ धावसंख्या उभारली. मुंबईने ही धावसंख्या एक फलंदाज गमावून पूर्ण केली. १६० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पहिल्या विकेटसाठी बिस्ता आणि तरे यांनी १११ धावांची भागीदारी केली. बिस्ताने आक्रमक खेळी करताना १० चौकार व २ षटकारांच्या सहाय्याने ६८ धावा केल्या. स्कोअरबोर्ड : मध्य प्रदेश ५-१५९ (पार्थ सहानी ४७) पराभूत वि. मुंबई १ बाद १६५ (आदित्य तरे ना. ७४, जय बिस्ता ६८).
मुंबईची हॅटट्रिक
सय्यद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेत मुंबईची विजयी घोडदौड कायम राहिली...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 Nov 2019, 4:00 am