अ‍ॅपशहर

महाराष्ट्राचे दोन विजय

बिहार राज्य कबड्डी असो. च्या विद्यमाने सुरु झालेल्या महिलांच्या ६४व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राने दोन साखळी विजय मिळवीत बाद फेरी गाठण्याच्या दृष्टीने आगेकूच सुरु केली.

Maharashtra Times 29 Nov 2016, 4:00 am
पाटणा : बिहार राज्य कबड्डी असो. च्या विद्यमाने सुरु झालेल्या महिलांच्या ६४व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राने दोन साखळी विजय मिळवीत बाद फेरी गाठण्याच्या दृष्टीने आगेकूच सुरु केली. बिहार येथील पाटलीपुत्र क्रीडा संकुल, पाटणा येथे मॅटवर सुरु असलेल्या महिलांच्या "ड" गटात महाराष्ट्राने काल रात्री उशीरा झालेल्या सामन्यात छत्तीसगडला ५२-१६ असे सहज नमविले. मध्यंतराला महाराष्ट्राकडे २४-०४ अशी मोठी आघाडी होती.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम national womens kabaddi
महाराष्ट्राचे दोन विजय

सकाळी झालेल्या दुसऱ्या सामन्यात त्यांनी पंजाबचा २७-१७असा पाडाव केला. मध्यांतराला ११-०७ अशी आघाडी घेणाऱ्या महाराष्ट्राने नंतर देखील सावध खेळ करीत सामना आपल्या हातून निसटणार नाही याची काळजी घेतली व सामना १० गुणांनी आपल्या नावे केला. या दोन्ही सामन्यात सायली जाधव, अभिलाषा म्हात्रे यांचा खेळ उल्लेखनीय झाला. महाराष्ट्राने तिसरा साखळी सामना देखील जिंकला. महाराष्ट्राने या सामन्यात यजमान बिहारवर ३०-१९ असा विजय मिळवीत बाद फेरीतील आपला प्रवेश निश्चित केला. मध्यंतरापर्यंत महाराष्ट्राकडे १३-१२ अशी एका गुणाची निसटती आघाडी होती. मध्यंतरानंतर मात्र महाराष्ट्राच्या सायली जाधव, सायली केरीपाळे,व अभिलाषा म्हात्रे यांनी आपला खेळ उंचावत हा विजय मिळविला. आता महाराष्ट्राचा फक्त झारखंड बरोबर सामना शिल्लक आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज