वृत्तसंस्था, नवी दिल्ली नुकत्याच झालेल्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदकविजेत्यांना भारत सरकारने पारितोषिके जाहीर केली असून १७४ सुवर्णपदकविजेत्यांना प्रत्येकी १.५ लाख रुपये इनाम देण्यात येणार आहे. तर रौप्य आणि ब्राँझ विजेत्यांना अनुक्रमे १ लाख आणि ५० हजार रु. इतके बक्षीस दिले जाईल, असे क्रीडामंत्री किरण रिजिजू यांनी म्हटले आहे. भारताने नेपाळमध्ये झालेल्या या स्पर्धेत तब्बल ३१२ पदके जिंकत पहिला क्रमांक मिळविला. त्यात १७४ सुवर्ण, ९३ रौप्य आणि ४५ ब्राँझपदकांचा समावेश आहे. १७४ सुवर्ण विजेत्यांना २ कोटी ६१ लाख इतकी रक्कम दिली जाणार असून रौप्यविजेत्यांसाठी ९३ लाख इतकी रक्कम बक्षीस म्हणून दिली जाईल तर ४५ ब्राँझविजेत्यांना २२ लाख ५० हजार इतकी रक्कम वितरित केली जाईल. सांघिक प्रकारांमुळे प्रत्येक खेळाडूला हे बक्षीस मिळणार असल्याने ही रक्कम आणखी वाढेल.
पदकविजेत्यांवर बक्षिसांचा वर्षाव
वृत्तसंस्था, नवी दिल्लीनुकत्याच झालेल्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदकविजेत्यांना भारत सरकारने पारितोषिके जाहीर केली असून १७४ ...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Dec 2019, 4:00 am