मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
रिओमध्ये सुरू असलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी आज ‘डबल धमाका’ उडवून दिला. उंच उडीमध्ये मरिय्यपन थांगावेलू याने ‘सुवर्ण’ पदक तर वरुण सिंग भाटी याने ‘कांस्य’ पदक पटकावले आहे. मरिय्यपन आणि वरुणच्या या पराक्रमानंतर भारतीयांकडून शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला आहे.
पॅरालिम्पिकच्या उंच उडी प्रकारात १.८९ मीटर उडी घेत सुवर्ण पटकावणाऱ्या मय्यपन थांगावेलू याची ही ऐतिहासिक कामगिरी ठरली आहे. कारण उंच उडी स्पर्धेत भारताला सुवर्ण मिळवून देणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. त्यापाठोपाठ वरुण सिंग भाटी याने १.८६ मीटर इतकी उंच उडी घेत तिसरा क्रमांक पटकावला.
उंच उडी स्पर्धेत भारताला शरद कुमारकडून मोठ्या आशा होत्या. मात्र त्याला सहाव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. तर सुवर्ण पदकासाठी मोठा दावेदार मानला जाणाऱ्या अमेरिकेचा खेळाडू सॅम ग्रीव्ह याला ‘रौप्य’ पदक मिळाले.
दरम्यान, पॅरालिम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळवणाऱ्या खेळाडूंना ७५ लाख, रौप्य पदकासाठी ५० लाख तर कांस्य पदकासाठी ३० लाख रुपये देऊन गौरवण्यात येणार असल्याचे क्रीडा मंत्रालयाने याआधीच स्पष्ट केले होते. मय्यपन आणि वरुण यांच्यानंतर पॅरालिम्पिकमध्ये भारताला आणखी पदके मिळतील अशा आशा पल्लवित झाल्या आहेत.
रिओमध्ये सुरू असलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी आज ‘डबल धमाका’ उडवून दिला. उंच उडीमध्ये मरिय्यपन थांगावेलू याने ‘सुवर्ण’ पदक तर वरुण सिंग भाटी याने ‘कांस्य’ पदक पटकावले आहे. मरिय्यपन आणि वरुणच्या या पराक्रमानंतर भारतीयांकडून शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला आहे.
पॅरालिम्पिकच्या उंच उडी प्रकारात १.८९ मीटर उडी घेत सुवर्ण पटकावणाऱ्या मय्यपन थांगावेलू याची ही ऐतिहासिक कामगिरी ठरली आहे. कारण उंच उडी स्पर्धेत भारताला सुवर्ण मिळवून देणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. त्यापाठोपाठ वरुण सिंग भाटी याने १.८६ मीटर इतकी उंच उडी घेत तिसरा क्रमांक पटकावला.
उंच उडी स्पर्धेत भारताला शरद कुमारकडून मोठ्या आशा होत्या. मात्र त्याला सहाव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. तर सुवर्ण पदकासाठी मोठा दावेदार मानला जाणाऱ्या अमेरिकेचा खेळाडू सॅम ग्रीव्ह याला ‘रौप्य’ पदक मिळाले.
दरम्यान, पॅरालिम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळवणाऱ्या खेळाडूंना ७५ लाख, रौप्य पदकासाठी ५० लाख तर कांस्य पदकासाठी ३० लाख रुपये देऊन गौरवण्यात येणार असल्याचे क्रीडा मंत्रालयाने याआधीच स्पष्ट केले होते. मय्यपन आणि वरुण यांच्यानंतर पॅरालिम्पिकमध्ये भारताला आणखी पदके मिळतील अशा आशा पल्लवित झाल्या आहेत.