नवी दिल्ली: युवा कुस्तीपटू सागर धनखड याच्या हत्येप्रकरणी ऑलिंपिकपटू सुशील कुमार याला दिल्ली पोलिसांच्या गुन्हे अन्वेशन विभागाचे पथक हरिद्वारला घेऊन गेले आहेत. वाचा- WTC फायनलमध्ये भारताविरुद्ध न्यूझीलंडचा डाव त्यांच्यावर उलटणार
सागर धनखड याच्या हत्येनंतर सुशील कुमार बराच काळ हरिद्वारमध्ये लपून बसला होता. यामुळे हरिद्वारमधून अनेक गोष्टींचा खुलासा होण्याची शक्यता आहे. पोलिसांच्या चौकशीत सुशील कुमार सहकार्य करत नसल्याचे वृत्त समोर येत आहे. त्याचा मोबाईल देखील अद्याप सापडलेला नाही. पोलिसांना संशय आहे की सुशिलचा फोन हरिद्वारमध्ये असू शकतो.
वाचा- पत्रकारांशी 'सोशल डिस्टंसिंग'; खेळाडूला ११ लाख रुपयांचा दंड
दिल्लीतील छत्रसाल स्टेडियममध्ये ४ आणि ५ मेच्या रात्री सागरला सुशीलने मारहाण केली होती. त्यानंतर रुग्णालयात उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला होता. सुशीलला दिल्ली पोलिसांनी २३ मे रोजी अटक केली होती. त्यानंतर न्यायालयाने प्रथम ६ दिवस आणि नंतर ४ दिवसांची पोलिस कोठडी दिली होती.
दरम्यान सागरच्या हत्येप्रकरणी अटक असलेल्या सुशील कुमारवर आणखी एक आरोप करण्यात आला आहे. एका दुकानदाराला सुशीलने मारहण केली होती. सुशीलने संबंधित दुकानदाराचे चार लाख रुपयांचे देणे होते. हे पैसे मागण्यास गेल्यावर सुशीलने त्याला मारहाण केली होती.
सागर धनखड याच्या हत्येनंतर सुशील कुमार बराच काळ हरिद्वारमध्ये लपून बसला होता. यामुळे हरिद्वारमधून अनेक गोष्टींचा खुलासा होण्याची शक्यता आहे. पोलिसांच्या चौकशीत सुशील कुमार सहकार्य करत नसल्याचे वृत्त समोर येत आहे. त्याचा मोबाईल देखील अद्याप सापडलेला नाही. पोलिसांना संशय आहे की सुशिलचा फोन हरिद्वारमध्ये असू शकतो.
वाचा- पत्रकारांशी 'सोशल डिस्टंसिंग'; खेळाडूला ११ लाख रुपयांचा दंड
दिल्लीतील छत्रसाल स्टेडियममध्ये ४ आणि ५ मेच्या रात्री सागरला सुशीलने मारहाण केली होती. त्यानंतर रुग्णालयात उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला होता. सुशीलला दिल्ली पोलिसांनी २३ मे रोजी अटक केली होती. त्यानंतर न्यायालयाने प्रथम ६ दिवस आणि नंतर ४ दिवसांची पोलिस कोठडी दिली होती.
दरम्यान सागरच्या हत्येप्रकरणी अटक असलेल्या सुशील कुमारवर आणखी एक आरोप करण्यात आला आहे. एका दुकानदाराला सुशीलने मारहण केली होती. सुशीलने संबंधित दुकानदाराचे चार लाख रुपयांचे देणे होते. हे पैसे मागण्यास गेल्यावर सुशीलने त्याला मारहाण केली होती.