अ‍ॅपशहर

लाज गेली! महाराष्ट्र केसरी स्पर्धेत धक्कादायक प्रकार; विजेत्या पृथ्वीराज पाटील याला बक्षीसच मिळाले नाही

तब्बल २१ वर्षानंतर कोल्हापूरच्या एका मल्लाने मानाचा महाराष्ट्र केसरी किताब जिंकला. पण हा किताब जिंकणाऱ्या १९ वर्षीय पृथ्वीराज पाटील याला बक्षीसच मिळाले नाही.

Authored byजयकृष्ण नायर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Apr 2022, 12:27 pm
सातारा: महाराष्ट्र केसरी किताबाचा विजेता कोल्हापुरचा मल्ल पृथ्वीराज पाटील याने मुंबईच्या प्रकाश बनकरला आस्मान दाखवत मानाची गदा मिळवली. मात्र या झालेल्या स्पर्धेनंतर बक्षीसच न मिळाल्याची खंत पृथ्वीराज पाटील याने बोलून दाखवली. काल शनिवारी झालेल्या स्पर्धेत इतिहास घडला होता.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम महाराष्ट्र केसरी २०२२ पृथ्वीराज पाटील
prithviraj patil


अवघ्या १९ वर्ष वयाच्या पृथ्वीराजने कोल्हापुरचं नाव कुस्ती क्षेत्रात सुवर्ण अक्षरात कोरले. पण त्याला बक्षीसच न दिल्याचे वृत्त वाऱ्या सारखे पसरले. साता-यात झालेली उपेक्षा ही गंभीर असल्याचे सध्या बोलले जातय. या प्रकारावर जागतीक कुस्ती स्पर्धेत विजेतेपद मिळवलेल्या सोनबा गोंगाने याने सुद्धा आवाज उठवलाय. कुस्ती खेळणारे मल्ल हे गरीब कुटुंबातुन येतात यामुळे त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी रोख रक्कम दिली गेली पाहिजे, असे मत व्यक्त केले.

वाचा- कोल्हापुरच्या पृथ्वीराज पाटीलने इतिहास घडवला, २१ वर्षानंतर पटकावली महाराष्ट्र केसरीची गदा

गृहराज्यमंत्र्यांनी लक्ष घातले

पृथ्वीराज पाटील यांना बक्षीस देणे गरजेचे आहे, जर हे दिले गेले नसेल तर नक्कीच बक्षीस का दिले गेले नाही याची माहिती घेतली जाईल, असे गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी सांगितले. मल्ल प्रचंड मेहनतीने हा किताब मिळवतात बक्षीसच देण्याची जबाबदारी जर शासनाची असेल तर शासनाकडून हे बक्षीस दिलं जाईल आणि जर ही जबाबदारी आयोजकांची असेल तर आयोजकांना सुचना दिल्या जातील. मात्र बक्षीसच न देणे ही मोठी चुक असल्याचं गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी म्हटलय.

काल शनिवारी झालेल्या लढतीत कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटील याने मुंबईच्या प्रकाश बनकर याचा पराभव करून महाराष्ट्र केसरीचा किताब पटाकवला. कोल्हापूर जिल्ह्याला २१ वर्षानंतर मानाची गदा मिळाली. अवघ्या १९ वर्षाचा पृथ्वीराज पाटील हा शेतकरी कुटुंबातुन आलेला मुलगा आहे, त्यामुळे त्याची कामगिरी ही कौतुकास्पद मानली जातेय. आमचे पांग फेडले अशी प्रतिक्रिया पृथ्वीराजचे वडील बाबासाहेब पाटील यांनी दिली.
लेखकाबद्दल
जयकृष्ण नायर
जयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज