वृत्तसंस्था, चेन्नई:
‘रिओ ऑलिंपिक स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केल्यानंतर माझ्याकडूनच्या अपेक्षा वाढल्या; पण आता मला याची सवय झाली आहे. मला सतत खेळून कष्टाने प्रावीण्य मिळवायला हवे. सतत सराव करून खेळात प्रावीण्य मिळवणे हाच माझा मंत्र आहे,’ अशा शब्दांत ऑलिंपिक पदक विजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने आपल्या उत्तम खेळाचे गुपित उघड केले.
ती म्हणाली, ‘बॅडमिंटनमधील प्रत्येक पैलूला खूपच महत्त्व आहे, असे मला वाटते. त्यामुळे मी खेळाच्या प्रत्येक पैलूवर काम करते आणि तो सुधारण्यासाठी कष्ट करते. प्रत्येक फटका मारण्यामध्ये जोपर्यंत परिपूर्णता किंवा प्रावीण्य येत नाही, तोपर्यंत सतत शिकत राहिले पाहिजे.’ ग्लासगोतील वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि दुबई वर्ल्ड सुपर सीरिज फायनल्स स्पर्धेमध्ये अगदी थोडक्यात सिंधूचे जेतेपद हुकले होते. पण गेल्या वर्षीच्या कामगिरीतून शिकण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत असे सिंधूला वाटते. याबाबत सिंधू म्हणाली, ‘माझ्यासाठी २०१७ हे वर्ष खरोखरच खूप उत्तम होते. खरोखच मला खूप सकारात्मक गोष्टी या वर्षात शिकता आल्या.’ सिंधूने गेल्या वर्षी इंडिया सुपर सीरिज आणि कोरिया सुपर सीरिज या स्पर्धांचे विजेतेपद पटकावले होते आणि हाँगकाँग ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत सिंधूने धडक दिली होती.
‘२०१८ मध्ये अनेक स्पर्धा होणार आहेत त्यात आणखी काही स्पर्धांची भरही पडणार आहे. मला सतत खेळत आणि कष्ट करत राहिले पाहिजे. या वर्षात आणखी यश मिळवता आले तर खूपच चांगले होईल,’ असे सिंधूने आपल्या या वर्षीतील योजनांबद्दल सांगितले.
‘रिओ ऑलिंपिक स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केल्यानंतर माझ्याकडूनच्या अपेक्षा वाढल्या; पण आता मला याची सवय झाली आहे. मला सतत खेळून कष्टाने प्रावीण्य मिळवायला हवे. सतत सराव करून खेळात प्रावीण्य मिळवणे हाच माझा मंत्र आहे,’ अशा शब्दांत ऑलिंपिक पदक विजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने आपल्या उत्तम खेळाचे गुपित उघड केले.
ती म्हणाली, ‘बॅडमिंटनमधील प्रत्येक पैलूला खूपच महत्त्व आहे, असे मला वाटते. त्यामुळे मी खेळाच्या प्रत्येक पैलूवर काम करते आणि तो सुधारण्यासाठी कष्ट करते. प्रत्येक फटका मारण्यामध्ये जोपर्यंत परिपूर्णता किंवा प्रावीण्य येत नाही, तोपर्यंत सतत शिकत राहिले पाहिजे.’ ग्लासगोतील वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि दुबई वर्ल्ड सुपर सीरिज फायनल्स स्पर्धेमध्ये अगदी थोडक्यात सिंधूचे जेतेपद हुकले होते. पण गेल्या वर्षीच्या कामगिरीतून शिकण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत असे सिंधूला वाटते. याबाबत सिंधू म्हणाली, ‘माझ्यासाठी २०१७ हे वर्ष खरोखरच खूप उत्तम होते. खरोखच मला खूप सकारात्मक गोष्टी या वर्षात शिकता आल्या.’ सिंधूने गेल्या वर्षी इंडिया सुपर सीरिज आणि कोरिया सुपर सीरिज या स्पर्धांचे विजेतेपद पटकावले होते आणि हाँगकाँग ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत सिंधूने धडक दिली होती.
‘२०१८ मध्ये अनेक स्पर्धा होणार आहेत त्यात आणखी काही स्पर्धांची भरही पडणार आहे. मला सतत खेळत आणि कष्ट करत राहिले पाहिजे. या वर्षात आणखी यश मिळवता आले तर खूपच चांगले होईल,’ असे सिंधूने आपल्या या वर्षीतील योजनांबद्दल सांगितले.