केशव महाराज आणि फिलँडर यांनी २५९ चेंडूंचा सामना करत १०९ धावांची भागीदारी रचली. त्यांचा विक्रम थोडक्यात हुकला. भारतात नवव्या किंवा दहाव्या विकेटसाठी सर्वाधिक चेंडूंचा सामना करण्याचा विक्रम स्टीव वॉ आणि गिलेस्पी यांच्या नावावर आहे. त्यांनी २००१मध्ये कोलकात्याला नवव्या विकेटसाठी २६८ चेंडूंत १३३ धावांची भागीदारी रचली होती. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये ५० किंवा त्याहून अधिक विकेट घेणारा अश्विन हा भारताचा चौथाच गोलंदाज ठरला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अनिल कुंबळेने सर्वाधिक ८४, जवागल श्रीनाथने ६४, तर हरभजनसिंगने ६० विकेट घेतल्या आहेत. भारताने दक्षिण आफ्रिकेवर पहिल्या डावात ३२६ धावांची आघाडी मिळविली. यापूर्वी, २०१०मध्ये भारताने कोलकात्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीनेशेहून अधिक धावांची आघाडी मिळविली होती. त्या लढतीत भारताने पहिल्या डावात ३४७ धावांची आघाडी मिळविली होती.
क्रीडा पान
केशव महाराज आणि फिलँडर यांनी २५९ चेंडूंचा सामना करत १०९ धावांची भागीदारी रचली त्यांचा विक्रम थोडक्यात हुकला...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 Oct 2019, 4:00 am