म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महाराष्ट्र शालेय अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेला शहरात मंगळवारी प्रारंभ झाला. या स्पर्धेत ६१५ खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. उद्योग राज्यमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी पंकज भारसाखळे, सुधीर नाईक, डॉ. संदीप जगताप, धनंजय पालोदकर, विजय देशपांडे, गणेश देशपांडे, विठ्ठल जाधव, विवेक सोहोनी, गौरव रे, परिमल कचरे, सचिन काळपांडे, अभिजीत वैष्णव, श्रीराम इंगे आदी उपस्थित होते.