म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
मुंबई येथे झालेल्या राज्यस्तरीय आंतर शालेय बास्केटबॉल स्पर्धेत देवगिरी कॉलेज संघाने १९ वर्षांखालील मुलांच्या गटात उपविजेतेपद पटाकावले.
या स्पर्धेत देवगिरी महाविद्यालय संघाने औरंगाबाद विभागाचे प्रतिनिधीत्व करताना नागपूर संघाला ४२-३३ असे पराभूत करुन अंतिम फेरीत धडक मारली होती. अंतिम लढतीत कोल्हापूर संघाने देवगिरी कॉलेज संघाला ४३-२१ असे नमवले. त्यामुळे देवगिरी कॉलेजला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. उपविजेत्या संघात तेजस जाधव, रुद्राक्ष पांडे, सौरभ दीपके, राजेश्वर परदेशी, सय्यद अमान, प्रणय, प्रज्योत कोलते, अनुप इरमुले, जयराज तिवारी, कार्तिक षण्मुगन, राजहंस, प्रेम मिश्रा यांचा समावेश आहे. या संघास क्रीडा विभाग प्रमुख प्रा. एकनाथ साळुंके, रणजित पवार, मनजितसिंग दरोगा यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या कामगिरीबद्दल मंडळाचे सरचिटणीस व आमदार सतीश चव्हाण, सदस्य पंडीतराव हर्षे, प्राचार्य डॉ. शिवाजी थोरे, उपप्राचार्य रजनीकांत गरुड, संभाजी कमानदार, प्रदीप सोळुंके, जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक गिरी, गोकुळ तांदळे, अॅड. संजय डोंगरे, संदीप ढंगारे यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.