मुंबई : महाराष्ट्र राज्य जलतरण संघटनेची निवडणूक सातारा येथे पार पडली आणि त्यात नव्या कार्यकारिणीची निवड पुढील चार वर्षांसाठी करण्यात आली आहे. यावर्षी भारतीय जलतरण फेडरेशनने राज्य संघटनेला बरखास्त करण्याचे पाऊल उचलले होते. त्याविरोधात कोर्टकचेरीही झाली. फेडरेशनने या निवडणुकीला विरोध दर्शविला होता आणि त्याला स्थगिती देण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धावही घेतली होती, पण हा अडथळा पार करत अखेर साताऱ्यात निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाली. मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश के. डी. पाटील यांच्या देखरेखीखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली.
सुधाकर शानभाग यांच्या अध्यक्षतेखाली ही नवी कार्यकारिणी आता २०१८ ते २०२२ या चार वर्षांच्या कालावधीत काम पाहणार आहे. या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील २५ जिल्हा संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मुंबई आणि पुण्याच्या संघटनांनाही रीतसर निवडणूक प्रक्रियेची माहिती देण्यात आली होती पण त्यांच्याकडून प्रतिसाद आला नाही.
नवी कार्यकारिणी अशी
अध्यक्ष : सुधाकर शानभाग (सातारा), उपाध्यक्ष : आनंद माने (अमरावती), भास्कर कुलकर्णी (सांगली), विजय आघाव (औरंगाबाद), सचिव : राजेंद्र पालकर (सिंधुदुर्ग). खजिनदार : पांडुरंग म्हात्रे (रायगड), सहसचिव : घनश्याम कुंवर (नाशिक), मनीषा बेडगे (रत्नागिरी), सदस्य : अनिल परचुरे (अकोला), रवींद्र जमजारे (भंडारा), मनोज व्यवहारे (बुलढाणा), चेतन मानकर (गोंदिया), प्रवीण लामखेडे (नागपूर), नंदन वर्तक (पालघर), राजेश मोरे (ठाणे), रामदास ढमाले (अहमदनगर), संजय शिंदे (वाशिम), धनंजय फडके (परभणी), सुनील उईके (वर्धा), हृदय बागवे (मुंबई उपनगर), श्रीकांत बल्की (चंद्रपूर).
सुधाकर शानभाग यांच्या अध्यक्षतेखाली ही नवी कार्यकारिणी आता २०१८ ते २०२२ या चार वर्षांच्या कालावधीत काम पाहणार आहे. या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील २५ जिल्हा संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मुंबई आणि पुण्याच्या संघटनांनाही रीतसर निवडणूक प्रक्रियेची माहिती देण्यात आली होती पण त्यांच्याकडून प्रतिसाद आला नाही.
नवी कार्यकारिणी अशी
अध्यक्ष : सुधाकर शानभाग (सातारा), उपाध्यक्ष : आनंद माने (अमरावती), भास्कर कुलकर्णी (सांगली), विजय आघाव (औरंगाबाद), सचिव : राजेंद्र पालकर (सिंधुदुर्ग). खजिनदार : पांडुरंग म्हात्रे (रायगड), सहसचिव : घनश्याम कुंवर (नाशिक), मनीषा बेडगे (रत्नागिरी), सदस्य : अनिल परचुरे (अकोला), रवींद्र जमजारे (भंडारा), मनोज व्यवहारे (बुलढाणा), चेतन मानकर (गोंदिया), प्रवीण लामखेडे (नागपूर), नंदन वर्तक (पालघर), राजेश मोरे (ठाणे), रामदास ढमाले (अहमदनगर), संजय शिंदे (वाशिम), धनंजय फडके (परभणी), सुनील उईके (वर्धा), हृदय बागवे (मुंबई उपनगर), श्रीकांत बल्की (चंद्रपूर).