जकार्ताः भारताचा भालाफेकपटू संदीप चौधरी, जलतरणपटू सुयश जाधव आणि धावपटू रक्षिताने पॅरा-एशियाड स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. यात संदीपने जागतिक विक्रमाची नोंद केली. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसअखेर भारताने तीन सुवर्ण, सहा रौप्य, सात ब्राँझ अशी एकूण ११ पदके मिळवून पदकतक्त्यात सहावे स्थान मिळवले आहे. सोमवारी सकाळच्या सत्रात संदीपने भालाफेकमध्ये पुरुषांच्या एफ ४२-४४/६१-६४ गटातून अव्वल स्थान पटकावून भारताच्या खात्यात पहिले पदक जमा केले. मध्यमपल्ल्याची धावपटू रक्षिता (टी ११, १५०० मीटर) आणि जलतरणपटू सुयश नारायण जाधवने (एस ७, ५० मीटर बटरफ्लाय) यांनी आणखी दोन सुवर्णपदके जमा केली. संदीप चौधरीने ६०.०१ मीटर कामगिरी नोंदवली. त्याने तिसऱ्या प्रयत्नात आपली ही सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. त्याने १९८०मधील चीनच्या मिंगजिए गावोचा ५९.८२ मीटरचा विक्रम मोडित काढला. जलतरणात ५० मीटर बटरफ्लायमध्ये सुयश जाधवने ३२.७१ सेकंद वेळ नोंदवून सुवर्ण कमाई केली. १५०० मीटर धावण्याच्या शर्यतीत रक्षिताने ५ मिनिटे ४०.६४ सेकंद वेळ नोंदवून अव्वल क्रमांक पटकावला.
सुयश, संदीपला सुवर्ण
जकार्ताः भारताचा भालाफेकपटू संदीप चौधरी, जलतरणपटू सुयश जाधव आणि धावपटू रक्षिताने पॅरा-एशियाड स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली...
Maharashtra Times 9 Oct 2018, 4:00 am