म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
उज्जेन (मध्य प्रदेश) येथे झालेल्या ६५व्या राष्ट्रीय शालेय तिरंदाजी स्पर्धेत ग्लोबल गुरुकुल शाळेच्या तन्मय गणेश अग्निहोत्रीने लक्षवेधक कामगिरी नोंदवत सुवर्णपदक जिंकले.
या स्पर्धेत १५ राज्यांच्या संघांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत महाराष्ट्र संघाने सर्वाधिक ७५ पदके जिंकत सर्वसाधारण जेतेपद मिळवले. यात औरंगाबादच्या तन्मय अग्निहोत्रीने सुवर्णपदक जिंकत स्पर्धा गाजवली. तन्मयला प्रशिक्षक सचिन टेकूर, शुभम शिंदे, सुमित आमलेकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. प्राचार्य चंचल अग्रवाल, जयश्री पवार, प्रिया सिंग, गणेश कुडधने, डॉ. हेमंत वर्मा, प्राचार्य डॉ. दयानंद भक्त, जिल्हा क्रीडा अधिकारी प्रमोदिनी अमृतवाड, रंगनाथ काळे, प्रकाश काळे, डॉ. सुहास सदावर्ते, डॉ. यशवंत सोनुने यांनी तन्मयचे अभिनंदन केले.