नवी दिल्ली:
भारताच्या तीन महिला टेबल टेनिसपटूंनी सोमवारी आयटीटीएफ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या मुख्य फेरीत प्रवेश मिळवला. बुडापेस्ट येथे ही स्पर्धा सुरू आहे. या आधी मनिका बात्राने मुख्य फेरी गाठली आहे. त्यात आता सुथिर्ता मुखर्जी, मधुरिका पाटकर आणि अर्चना कामत यांची भर पडली आहे.
पात्रता फेरीत मधुरिकाने त्रिनिदाद अँड टोबॅगोच्या कॅथरिन स्पिसरवर ११-३, ११-८, ११-३, ११-६ अशी मात केली. मधुरिकाने पहिल्या लढतीत लॅटव्हियाच्या सबिना मुसाजेवावर ११-४, ११-४, ९-११, ११-४, ११-७ अशी मात केली होती. यानंतर सुथिर्ताने स्वित्झर्लंडच्या रॅचेल मोरेटवर १४-१२, १२-१०, ११-८, ११-९ अशी मात केली. तत्पूर्वी, पहिल्या लढतीत सुथिर्ताने घानाच्या सेलिया बाह डान्सोवर ११-४, ११-५, ११-१, ११-८ असा विजय मिळवला. अर्चनाने स्लोवाकियाच्या एव्हा ओडोरोवावर ४-११, ८-११, ११-९, ११-५, ११-५ असा संघर्षपूर्ण विजय मिळवला. अर्चनाला सलग दुसऱ्या लढतीत चिवट झुंज द्यावी लागली. तिने पहिल्या लढतीत इव्हाना पेट्रिकवर ११-८, ८-११, ११-७, ११-५, ११-५ असा विजय मिळवला होता. मनिकाला जागतिक क्रमवारीनुसार थेट मुख्य फेरीत प्रवेश मिळाला आहे.
पुरुषांच्या पात्रता फेरीत अमलराज आणि मानव यांनी आपापल्या गटात अव्वल स्थान पटकावले आहे. मानवने पहिल्या लढतीत पोलंडच्या पॅट्रिक चोज्नोवास्कीवर ११-८, ११-९, ५-११, ६-११, ११-५, ११-६ अशी, तर दुसऱ्या लढतीत अमेरिकेच्या निकोलस टिओवर ११-६, ११-९, १३-११, १२-१४, ११-३ अशी मात केली. अमलराजला पहिल्या लढतीत पुढे चाल मिळाली होती. त्याने दुसऱ्या लढतीत अॅलन गुटिएरेझवर ११-६, ११-३, ११-६, ११-७ असा विजय मिळवला.
भारताच्या तीन महिला टेबल टेनिसपटूंनी सोमवारी आयटीटीएफ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या मुख्य फेरीत प्रवेश मिळवला. बुडापेस्ट येथे ही स्पर्धा सुरू आहे. या आधी मनिका बात्राने मुख्य फेरी गाठली आहे. त्यात आता सुथिर्ता मुखर्जी, मधुरिका पाटकर आणि अर्चना कामत यांची भर पडली आहे.
पात्रता फेरीत मधुरिकाने त्रिनिदाद अँड टोबॅगोच्या कॅथरिन स्पिसरवर ११-३, ११-८, ११-३, ११-६ अशी मात केली. मधुरिकाने पहिल्या लढतीत लॅटव्हियाच्या सबिना मुसाजेवावर ११-४, ११-४, ९-११, ११-४, ११-७ अशी मात केली होती. यानंतर सुथिर्ताने स्वित्झर्लंडच्या रॅचेल मोरेटवर १४-१२, १२-१०, ११-८, ११-९ अशी मात केली. तत्पूर्वी, पहिल्या लढतीत सुथिर्ताने घानाच्या सेलिया बाह डान्सोवर ११-४, ११-५, ११-१, ११-८ असा विजय मिळवला. अर्चनाने स्लोवाकियाच्या एव्हा ओडोरोवावर ४-११, ८-११, ११-९, ११-५, ११-५ असा संघर्षपूर्ण विजय मिळवला. अर्चनाला सलग दुसऱ्या लढतीत चिवट झुंज द्यावी लागली. तिने पहिल्या लढतीत इव्हाना पेट्रिकवर ११-८, ८-११, ११-७, ११-५, ११-५ असा विजय मिळवला होता. मनिकाला जागतिक क्रमवारीनुसार थेट मुख्य फेरीत प्रवेश मिळाला आहे.
पुरुषांच्या पात्रता फेरीत अमलराज आणि मानव यांनी आपापल्या गटात अव्वल स्थान पटकावले आहे. मानवने पहिल्या लढतीत पोलंडच्या पॅट्रिक चोज्नोवास्कीवर ११-८, ११-९, ५-११, ६-११, ११-५, ११-६ अशी, तर दुसऱ्या लढतीत अमेरिकेच्या निकोलस टिओवर ११-६, ११-९, १३-११, १२-१४, ११-३ अशी मात केली. अमलराजला पहिल्या लढतीत पुढे चाल मिळाली होती. त्याने दुसऱ्या लढतीत अॅलन गुटिएरेझवर ११-६, ११-३, ११-६, ११-७ असा विजय मिळवला.