वृत्तसंस्था, ढाका
अखेरच्या मिनिटाला केलेल्या गोलमुळे भारताने शुक्रवारी बांगलादेशावर ५-४ अशी मात करत १८ वर्षांखालील आशिया कप हॉकी स्पर्धा जिंकली. स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात यजमान बांगलादेशने अखेरच्या मिनिटापर्यंत रंगलेल्या लढतीत भारतावर अशाच मार्जिनने विजय मिळवला होता. त्याचीच पुनरावृत्ती शुक्रवारीही झाली; पण यावेळी जणू डोळ्यात तेल घालून खेळणाऱ्या भारतीय संघाने चुका टाळत बांगलादेशवर मात केली अन् ट्रॉफीवरच नाव कोरले.
भारताने सुरुवातच धडाक्यात केली. सलामीच्या झुंजीत झालेल्या चुका यावेळी करायच्या नाहीत, असे ठरवूनच मैदानात उतरलेल्या भारतीय ज्युनियर संघाने चेंडू आपल्याच ताब्यात राहील, याची पूर्ण खबरदारी घेतली. यामुळेच सामन्याच्या सहाव्या मिनिटाला भारताला पहिला पेनल्टी कॉर्नर लाभला. मात्र त्याचे गोलमध्ये रुपांतर करणे भारताला जमले नाही. अशातच आघाडी घेतली ती बांगलादेशाने. त्याआधीचे त्यांचे प्रयत्न भारताचा गोलरक्षक पंकजकुमार रजकने उधळवून लावले हे आवर्जून नमूद करावे लागेल; मात्र एम. रोमन सरकारने बांगलादेशाला आघाडी मिळवून दिली. त्यांचा आघाडीचा आनंद फारकाळ टिकला नाही; कारण शिवम आनंदने गोल करुन भारताला सामन्यात बरोबरी साधून दिली. बांगलादेशच्या दोन डीफेंडरला चकवत शिवमने सुरेख गोल केला. त्यानंतर काही वेळातच भारताला पुन्हा पेनल्टी मिळाली, पण त्याचे गोलमध्ये रुपांतर करणे भारताला जमले नाही.
यादरम्यान काऊंटर अॅटॅक करणे बांगलादेशने सुरूच ठेवले होते. मिडफील्डकडून आलेल्या पासला मोहम्मद मोहसिनने डावीकडून गोलजाळ्यात धाडले अन् बांगलादेशाला आघाडी मिळाली.
मध्यंतरात डावपेचांमध्ये काहीसे बदल करत भारतीय संघ पुन्हा सज्ज झाला अन् पेनल्टी कॉर्नरचा सदुपयोग करत हार्दिकसिंगने भारताला सामन्यात बरोबरी साधून दिली. तर काहीच मिनिटांनी दलप्रीतसिंगने गोल केल्यामुळे भारताला सामन्यात आघाडी मिळाली. सलामीची झुंज गाजवणाऱ्या बांगलादेशाच्या मोहम्मद अश्रफुल इस्लामने मग पुढाकार घेत ६०व्या मिनिटाला गोल केला. यामुळे भारतीय संघावर फार परिणाम झाला नाही. इबंगोसिंग कोंजेंगबमने भारतासाठी गोल करत सामन्यातील आघाडी वाढवली.
घरच्या मैदानावर खेळणाऱ्या बांगलादेशने प्रयत्न सुरू ठेवले. महबूब हुसेनने ६४व्या मिनिटाला आत्मविश्वासाने गोल केल्याने सामन्यात ४-४ बरोबरी झाली.
अखेरच्या काही सेकंदात गफलत करण्याची चूक भारताचा सीनियर हॉकी संघ करतो; पण ज्युनियर्सनी ते टाळले. सामना संपल्याचा हूटर वाजण्याआधीच अभिषेकने गोल केला जो निर्णायक ठरला. भारताने आशिया कप जिंकला... हार्दिकसिंग सामनावीर ठरला, तर भारताचा पंकजकुमार रजकला सर्वोत्तम गोलरक्षकाचा मान मिळाला.
अखेरच्या मिनिटाला केलेल्या गोलमुळे भारताने शुक्रवारी बांगलादेशावर ५-४ अशी मात करत १८ वर्षांखालील आशिया कप हॉकी स्पर्धा जिंकली. स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात यजमान बांगलादेशने अखेरच्या मिनिटापर्यंत रंगलेल्या लढतीत भारतावर अशाच मार्जिनने विजय मिळवला होता. त्याचीच पुनरावृत्ती शुक्रवारीही झाली; पण यावेळी जणू डोळ्यात तेल घालून खेळणाऱ्या भारतीय संघाने चुका टाळत बांगलादेशवर मात केली अन् ट्रॉफीवरच नाव कोरले.
भारताने सुरुवातच धडाक्यात केली. सलामीच्या झुंजीत झालेल्या चुका यावेळी करायच्या नाहीत, असे ठरवूनच मैदानात उतरलेल्या भारतीय ज्युनियर संघाने चेंडू आपल्याच ताब्यात राहील, याची पूर्ण खबरदारी घेतली. यामुळेच सामन्याच्या सहाव्या मिनिटाला भारताला पहिला पेनल्टी कॉर्नर लाभला. मात्र त्याचे गोलमध्ये रुपांतर करणे भारताला जमले नाही. अशातच आघाडी घेतली ती बांगलादेशाने. त्याआधीचे त्यांचे प्रयत्न भारताचा गोलरक्षक पंकजकुमार रजकने उधळवून लावले हे आवर्जून नमूद करावे लागेल; मात्र एम. रोमन सरकारने बांगलादेशाला आघाडी मिळवून दिली. त्यांचा आघाडीचा आनंद फारकाळ टिकला नाही; कारण शिवम आनंदने गोल करुन भारताला सामन्यात बरोबरी साधून दिली. बांगलादेशच्या दोन डीफेंडरला चकवत शिवमने सुरेख गोल केला. त्यानंतर काही वेळातच भारताला पुन्हा पेनल्टी मिळाली, पण त्याचे गोलमध्ये रुपांतर करणे भारताला जमले नाही.
यादरम्यान काऊंटर अॅटॅक करणे बांगलादेशने सुरूच ठेवले होते. मिडफील्डकडून आलेल्या पासला मोहम्मद मोहसिनने डावीकडून गोलजाळ्यात धाडले अन् बांगलादेशाला आघाडी मिळाली.
मध्यंतरात डावपेचांमध्ये काहीसे बदल करत भारतीय संघ पुन्हा सज्ज झाला अन् पेनल्टी कॉर्नरचा सदुपयोग करत हार्दिकसिंगने भारताला सामन्यात बरोबरी साधून दिली. तर काहीच मिनिटांनी दलप्रीतसिंगने गोल केल्यामुळे भारताला सामन्यात आघाडी मिळाली. सलामीची झुंज गाजवणाऱ्या बांगलादेशाच्या मोहम्मद अश्रफुल इस्लामने मग पुढाकार घेत ६०व्या मिनिटाला गोल केला. यामुळे भारतीय संघावर फार परिणाम झाला नाही. इबंगोसिंग कोंजेंगबमने भारतासाठी गोल करत सामन्यातील आघाडी वाढवली.
घरच्या मैदानावर खेळणाऱ्या बांगलादेशने प्रयत्न सुरू ठेवले. महबूब हुसेनने ६४व्या मिनिटाला आत्मविश्वासाने गोल केल्याने सामन्यात ४-४ बरोबरी झाली.
अखेरच्या काही सेकंदात गफलत करण्याची चूक भारताचा सीनियर हॉकी संघ करतो; पण ज्युनियर्सनी ते टाळले. सामना संपल्याचा हूटर वाजण्याआधीच अभिषेकने गोल केला जो निर्णायक ठरला. भारताने आशिया कप जिंकला... हार्दिकसिंग सामनावीर ठरला, तर भारताचा पंकजकुमार रजकला सर्वोत्तम गोलरक्षकाचा मान मिळाला.