अ‍ॅपशहर

विशालची पकड निसटतेय

‘विशाल माने पाटणा पायरेट्स मुख्य बचावपटू आहे. संघात सर्वात सीनियर. प्रदीप नरवालपेक्षाही त्याचा अनुभव मोठा आहे; कारण तो प्रो कबड्डीचे पाचही मोसम खेळला आहे. सहाजिकच त्याच्यासारख्या अनुभवी कबड्डीपटूकडून सफाईदार कामगिरीची अपेक्षा आहे. मात्र तो क्षुल्लक चुकांची पुनरावृत्ती करतो. किमान त्याच्यासारख्या कबड्डीपटूने तरी ‘अॅडव्हान्स टॅकल’ करू नयेत’, हे परखड बोल आहेत पाटणा पायरेट्सचे प्रशिक्षक राममेहरसिंह यांचे.

विनायक राणे | Maharashtra Times 28 Sep 2017, 4:00 am
‘विशाल माने पाटणा पायरेट्स मुख्य बचावपटू आहे. संघात सर्वात सीनियर. प्रदीप नरवालपेक्षाही त्याचा अनुभव मोठा आहे; कारण तो प्रो कबड्डीचे पाचही मोसम खेळला आहे. सहाजिकच त्याच्यासारख्या अनुभवी कबड्डीपटूकडून सफाईदार कामगिरीची अपेक्षा आहे. मात्र तो क्षुल्लक चुकांची पुनरावृत्ती करतो. किमान त्याच्यासारख्या कबड्डीपटूने तरी ‘अॅडव्हान्स टॅकल’ करू नयेत’, हे परखड बोल आहेत पाटणा पायरेट्सचे प्रशिक्षक राममेहरसिंह यांचे. प्रो कबड्डी लीगच्या दिल्ली टप्प्यातील दिल्लीविरुद्धच्या लढतीनंतर या प्रशिक्षकाने पुन्हा विशालबाबत तक्रारीचा सूर लावला. याआधी मुंबई व कोलकात्यालाही त्यांनी याबाबत उघड नाराजी व्यक्त केली होती.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम vishal mane loosing his grip as defender
विशालची पकड निसटतेय


राममेहर म्हणतात, ‘विशालने आपल्या बचावातील सहकाऱ्यांसह समन्वय साधून, त्यांच्या हालचाली पाहून पावले उचलायला हवीत; पण तसे होत नाही. एखाद्या नवख्या खेळाडूचे चुकणे आपण समजू शकतो. मात्र विशालसारख्या खेळाडूकडून अशा क्षुल्लक चुका होणे पटण्यासारखे नाही. विशालकडून आणखी चांगल्या कामगिरीची अपेक्षा, तसे झाल्यास पाटण्याची चिंता मिटेल. तसेच पुढील गोष्टी सोप्या होताल’. राममेहरसिंह यांच्या बोलण्यात तथ्यदेखील आहे. यंदाचा मोसम सुरू झाल्यापासूनच विशाल मानेच्या कामगिरीत सातत्य नाही. सुरुवातीच्या मोसमांमध्ये यू मुम्बाचे यशस्वी प्रतिनिधित्व करताना प्रतिस्पर्धी चढाईपटूंना त्याचा दरारा वाटत असे, पण हा दरारा कमी होताना दिसतो आहे.

‘दिल्लीतील दिल्लीविरुद्धच्या झुंजीत पाटण्याच्या जयदीपने अधोरेखित करावी अशी कामगिरी केली; विशाल आणि त्याच्या जोडीदारानेही आणखी चांगली कामगिरी करावी, असे वाटते. जेणे करून पाटणा संघ फक्त चढाईपटूंवर अवलंबून आहे, असे म्हणणाऱ्यांची तोंडे बंद होतील. कारण यंदाच्या मोसमात बऱ्याचदा त्यांच्यामुळे संघ अडचणीत आला आहे’, असे नमूद करणारे राममेहर अप्रत्यक्षपणे बचावपटूंना संदेश देतात. खरेतर मुंबईतील लढतीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी अशीच नाराजी व्यक्त केली होती. तेव्हा तर स्वतः विशाल त्यांच्या बाजूला बसला होता.

नेहमीच चुकणाऱ्या बचावफळीसह कधीतरी चढाईपटूही गोंधळले तर सहज जिंकणारी लढतही कठीण होऊन बसते, याकडे लक्ष वेधताना राममेहरसिंह यांनी दिल्लीविरुद्धच्या झुंजीचे उदाहरण दिले. ते सांगतात, ‘जेतेपदाची हॅटट्रिक करण्याचे प्रयत्न असतीलच; पण त्यासाठी पाठिराख्यांची प्रार्थना, खेळाडूंचे फिट राहणे खूप महत्त्वाचे आहे. प्रदीपच्या फिटनेससह बचावाची कामगिरी जबरदस्त होणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. चढाई आणि बचावाची भट्टी जमून यायला हवी. चढाईत पुढे आणि बचावात मागे, असे चालणार नाही. दोन्ही आघाड्यांवर अचूक पाऊले पडायला हवीत’. पाटण्याने याआधी सलग दोनदा लीग जिंकली आहे, तेव्हाही चढाईपटूंसह बचावाचा वाटा मोठा होता. यंदा मात्र बचाव हा पाटण्याची दुबळी बाजू बनला आहे. ते जाणुनबुजून चूकत नसतीलही; पण प्रत्येक सामन्यात त्याच, त्याच चुका होणे चांगले लक्षण नसल्याचे निराश राममेहरसिंह नमूद करतात.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज