मुंबई : सिद्धार्थ आक्रेच्या नाबाद १०० धावा आणि जगजीत रंधवाची नाबाद ५९ धावांची खेळी यामुळे मुंबई विद्यापीठाने पश्चिम विभाग क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. मुंबई विद्यापीठाने भोपाळ विद्यापीठावर १० विकेटसनी दणदणीत मात केली. भोपाळने प्रथम फलंदाजी करताना ४० षटकांत ८-१७३ धावा केल्या होत्या. मुंबईने एकही विकेट न गमावता ही धावसंख्या पार केली.
आक्रेच्या शतकामुळे मुंबई विद्यापीठ विजेते
सिद्धार्थ आक्रेच्या नाबाद १०० धावा आणि जगजीत रंधवाची नाबाद ५९ धावांची खेळी यामुळे मुंबई विद्यापीठाने पश्चिम विभाग क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद ...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Jan 2020, 4:00 am