अ‍ॅपशहर

सलामीच्या सामन्यातच भारतावर नामुष्की

पहिल्या कबड्डी वर्ल्डकप स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात दक्षिण कोरियाने भारताचा ३२ विरुद्ध ३४ असा दोन गुणांच्या फरकांनी पराभव केला. अतिशय चुरशीच्या झालेल्या सामन्यात अखेरच्या काही मिनिटांत कोरियाने चमकदार कामगिरी करत भारताच्या तोंडापर्यंत आलेला विजयाचा घास हिसकावून घेतला.

Maharashtra Times 7 Oct 2016, 10:30 pm
मटा ऑनलाइन वृत्त । अहमदाबाद
महाराष्ट्र टाइम्स.कॉम world cup kabaddi 2016 first time ever south korea have beaten india
सलामीच्या सामन्यातच भारतावर नामुष्की


पहिल्या कबड्डी वर्ल्डकप स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात दक्षिण कोरियाने भारताचा ३२ विरुद्ध ३४ असा दोन गुणांच्या फरकांनी पराभव केला. अतिशय चुरशीच्या झालेल्या सामन्यात अखेरच्या काही मिनिटांत कोरियाने चमकदार कामगिरी करत भारताच्या तोंडापर्यंत आलेला विजयाचा घास हिसकावून घेतला. यामुळे सलामीच्या सामन्यात यजमान भारताला धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला.

सामन्याच्या सुरुवातीला गुणांचं खातं कोरियानेच उघडलं. पण नंतर भारतीय संघाने आघाडी घेत कोरियाच्या संघाला मागे टाकलं. भारताने पहिल्या सत्रात कोरियावर १३ विरुद्ध १८ अशा पाच गुणांच्या फरकाने आघाडी घेतली होती. दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाही भारताच्या संघाने आपली आघाडी कायम ठेवली. पण सामना संपण्याची वेळ जसजशी जवळ येत गेली तसा कोरियाने आक्रमक चढाई करत सामना अतीतटीचा केला. कोरियाने भारतीय संघाला ऑल आउट करत गुण संख्या बरोबरीत आणली. यात कोरियाचा कर्णधार 'जँग कुन ली' याने अतिशय उत्तम चढाई करत गुण पटकावले. शेवटच्या मिनिटांत कोरियाने यशस्वी हल्ला करत भारताचा दोन गुणांच्या फरकाने पराभव केला.

कबड्डी वर्ल्डकप स्पर्धेचे शानदार उद्घाटन

पहिल्या कबड्डी वर्ल्डकप स्पर्धेचे अहमदाबादमध्ये शानदार सोहळ्यात उद्घाटन झाले. एकूण १२ देश या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्या हस्ते हे उद्घाटन झाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज