नवी दिल्ली :
डेव्हिस कप टेनिस स्पर्धेतील सर्बियाविरुद्धच्या लढतीसाठी जीवन नेदुन्चेळीयन आणि पूरव राजा यांच्या ऐवजी एन. श्रीराम बालाजी यांची निवड करण्याच्या निर्णयाचे संघाचा कर्णधार महेश भूपतीने समर्थन केले आहे.
भारत-सर्बिया यांच्यातील डेव्हिस कप वर्ल्ड ग्रुप प्ले-ऑफमधील लढत १४ ते १६ सप्टेंबरदरम्यान सर्बियात होणार आहे. यात दुखापतीमुळे दिवीज शरण आणि युकी भांबरीने माघार घेतली. युकीच्या जागी साकेत मायनेनीची निवड करण्यात आली, तर सुमीत नागलने नकार दिल्याने एन. श्रीराम बालाजीला संघात स्थान देण्यात आले. गेल्या वर्षीय बालाजीने उझबेकिस्तानविरुद्धच्या लढतीत विजय मिळवला होता. डेव्हिस कपमधील ही त्याची दुसरी लढत असेल. खरे तर अखिल भारतीय टेनिस संघटना क्रमवारीनुसार खेळाडूंची निवड करते. या वेळी मात्र तसे झालेले नाही. याबाबत भूपती म्हणाला, 'मला संघात समतोल राखायचा होता. डावखुरा प्रज्ञेश संघात आहे. तेव्हा मला ज्याची सर्व्हिस वेगवान असेल, असा खेळाडू हवा होता.' एटीपी क्रमवारीत बालाजी ११०व्या स्थानावर असून, नेदुन्चेळीयन ८८व्या, तर पूरव राजा ८९व्या स्थानावर आहे. भूपती पुढे म्हणाला, 'डेव्हिस कपमध्ये दुहेरी विरुद्ध एकेरी अशी लढत नाही. अशा वेळी प्रतिस्पर्धी, कोर्टचा प्रकार, तेथील परिस्थिती आणि जोड्यांमधील संयोजनही महत्त्वाचे असते. प्रत्येक वेळी क्रमवारीचा विचार करून चालत नाही.' संघटनेचे चेअरमन एस. पी. मिश्रा यांनी स्पष्ट केले आहे की संघाची निवड ही नॉन-प्लेइंग कर्णधारांच्या शिफारशीनुसार केली आहे.
डेव्हिस कप टेनिस स्पर्धेतील सर्बियाविरुद्धच्या लढतीसाठी जीवन नेदुन्चेळीयन आणि पूरव राजा यांच्या ऐवजी एन. श्रीराम बालाजी यांची निवड करण्याच्या निर्णयाचे संघाचा कर्णधार महेश भूपतीने समर्थन केले आहे.
भारत-सर्बिया यांच्यातील डेव्हिस कप वर्ल्ड ग्रुप प्ले-ऑफमधील लढत १४ ते १६ सप्टेंबरदरम्यान सर्बियात होणार आहे. यात दुखापतीमुळे दिवीज शरण आणि युकी भांबरीने माघार घेतली. युकीच्या जागी साकेत मायनेनीची निवड करण्यात आली, तर सुमीत नागलने नकार दिल्याने एन. श्रीराम बालाजीला संघात स्थान देण्यात आले. गेल्या वर्षीय बालाजीने उझबेकिस्तानविरुद्धच्या लढतीत विजय मिळवला होता. डेव्हिस कपमधील ही त्याची दुसरी लढत असेल. खरे तर अखिल भारतीय टेनिस संघटना क्रमवारीनुसार खेळाडूंची निवड करते. या वेळी मात्र तसे झालेले नाही. याबाबत भूपती म्हणाला, 'मला संघात समतोल राखायचा होता. डावखुरा प्रज्ञेश संघात आहे. तेव्हा मला ज्याची सर्व्हिस वेगवान असेल, असा खेळाडू हवा होता.' एटीपी क्रमवारीत बालाजी ११०व्या स्थानावर असून, नेदुन्चेळीयन ८८व्या, तर पूरव राजा ८९व्या स्थानावर आहे. भूपती पुढे म्हणाला, 'डेव्हिस कपमध्ये दुहेरी विरुद्ध एकेरी अशी लढत नाही. अशा वेळी प्रतिस्पर्धी, कोर्टचा प्रकार, तेथील परिस्थिती आणि जोड्यांमधील संयोजनही महत्त्वाचे असते. प्रत्येक वेळी क्रमवारीचा विचार करून चालत नाही.' संघटनेचे चेअरमन एस. पी. मिश्रा यांनी स्पष्ट केले आहे की संघाची निवड ही नॉन-प्लेइंग कर्णधारांच्या शिफारशीनुसार केली आहे.