म.टा.प्रतिनिधी, नागपूर
देशात आजच्या घडीला अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. लाखोंना रोजगार देण्याची क्षमता देशात आहे. क्षमता असलेल्या देशांनी या संधींचा फायदा घेण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन केंद्रीय भूतल परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी केले. महात्मा फुले चेंबर ऑफ कॉमर्स इंडियाच्यावतीने आयोजित माळी समाज उद्योजक प्रदर्शनी व संमेलनाच्या समारोपात ते बोलत होते.
गडकरी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख अतिथी होते. खासदार कृपाल तुमाने, भाजपचे शहराध्यक्ष सुधाकर कोहळे, आमदार कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, शिक्षक आमदार नागो गाणार, अशोक मानकर, नगरसेवक अविनाश ठाकरे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
‘देशभरात सध्या दीड लाख कोटींची रस्तेविकासाची कामे सुरू आहेत. ही कामे करण्यासाठी कंत्राटदारांची कमतरता निर्माण झाली आहे. येत्या दोन वर्षांत ५ लाख कोटी रुपयांची कामे करण्याचा निश्चय आम्ही केला आहे. त्याचप्रमाणे देशांतर्गत जलवाहतुकीसाठी १८ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे’, असे गडकरी म्हणाले. उद्योग आणि कृषी या क्षेत्रात अनेक संधी आहेत. उद्योजकता वाढविण्यासाठी समाजात वातावरण निर्माण करण्याची गरज आहे. महात्मा फुले चेंबर ऑफ कॉमर्स इंडियाच्या स्थापनेमुळे माळी समाजाच्या विकासाला चालना मिळेल, असेही त्यांनी सांगितले.
डिक्कीसारख्या संघटनेबरोबर राज्य सरकारने करार केला आहे. दलित उद्योजकांना जागा देणे, त्यांच्या मालाची खरेदी करणे यासाठी धोरण निश्चित करण्यात आले आहे. महात्मा फुले चेंबर ऑफ कॉमर्स इंडियाने असा प्रस्ताव आणल्यास राज्य सरकार शक्य ती सर्व मदत करेल. कौशल्य विकासाचे उपक्रम राबविण्यावर भर दिला जावा, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
माळी समाजातील तरुणांसाठी चांगले व्यासपीठ निर्माण केल्याबद्दल महात्मा फुले चेंबर ऑफ कॉमर्स इंडियाचे त्यांनी अभिनंदन केले. राजाराम निर्वाण, ग.वि.हिवसे, सदाशिव महादुरे व महादेव मानकर यांना यावेळी मरणोत्तर उद्योजक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मारोती नवले, शंकर बोरकर, डी.बी.महाजन, सदाशिव बोराटे व डॉ. केशव यावलकर यांना लाइफटाइम अचिव्हमेंट उद्योजक पुरस्कार देण्यात आला. त्याचप्रमाणे, जयश्री अतुल रासणे आणि लक्ष्मी दीपक भुजाडे यांना अनुक्रमे महिला उद्योजक व यंग अचिवर उद्योजक पुरस्कार देण्यात आला. कार्यक्रमाला माळी समाजातील अनेक उद्योजक, मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देशात आजच्या घडीला अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. लाखोंना रोजगार देण्याची क्षमता देशात आहे. क्षमता असलेल्या देशांनी या संधींचा फायदा घेण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन केंद्रीय भूतल परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी केले. महात्मा फुले चेंबर ऑफ कॉमर्स इंडियाच्यावतीने आयोजित माळी समाज उद्योजक प्रदर्शनी व संमेलनाच्या समारोपात ते बोलत होते.
गडकरी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख अतिथी होते. खासदार कृपाल तुमाने, भाजपचे शहराध्यक्ष सुधाकर कोहळे, आमदार कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, शिक्षक आमदार नागो गाणार, अशोक मानकर, नगरसेवक अविनाश ठाकरे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
‘देशभरात सध्या दीड लाख कोटींची रस्तेविकासाची कामे सुरू आहेत. ही कामे करण्यासाठी कंत्राटदारांची कमतरता निर्माण झाली आहे. येत्या दोन वर्षांत ५ लाख कोटी रुपयांची कामे करण्याचा निश्चय आम्ही केला आहे. त्याचप्रमाणे देशांतर्गत जलवाहतुकीसाठी १८ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे’, असे गडकरी म्हणाले. उद्योग आणि कृषी या क्षेत्रात अनेक संधी आहेत. उद्योजकता वाढविण्यासाठी समाजात वातावरण निर्माण करण्याची गरज आहे. महात्मा फुले चेंबर ऑफ कॉमर्स इंडियाच्या स्थापनेमुळे माळी समाजाच्या विकासाला चालना मिळेल, असेही त्यांनी सांगितले.
डिक्कीसारख्या संघटनेबरोबर राज्य सरकारने करार केला आहे. दलित उद्योजकांना जागा देणे, त्यांच्या मालाची खरेदी करणे यासाठी धोरण निश्चित करण्यात आले आहे. महात्मा फुले चेंबर ऑफ कॉमर्स इंडियाने असा प्रस्ताव आणल्यास राज्य सरकार शक्य ती सर्व मदत करेल. कौशल्य विकासाचे उपक्रम राबविण्यावर भर दिला जावा, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
माळी समाजातील तरुणांसाठी चांगले व्यासपीठ निर्माण केल्याबद्दल महात्मा फुले चेंबर ऑफ कॉमर्स इंडियाचे त्यांनी अभिनंदन केले. राजाराम निर्वाण, ग.वि.हिवसे, सदाशिव महादुरे व महादेव मानकर यांना यावेळी मरणोत्तर उद्योजक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मारोती नवले, शंकर बोरकर, डी.बी.महाजन, सदाशिव बोराटे व डॉ. केशव यावलकर यांना लाइफटाइम अचिव्हमेंट उद्योजक पुरस्कार देण्यात आला. त्याचप्रमाणे, जयश्री अतुल रासणे आणि लक्ष्मी दीपक भुजाडे यांना अनुक्रमे महिला उद्योजक व यंग अचिवर उद्योजक पुरस्कार देण्यात आला. कार्यक्रमाला माळी समाजातील अनेक उद्योजक, मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.