अ‍ॅपशहर

‘MNS चा भोंगा वाजणार का?’ राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावर काय म्हणतेय मराठी जनता?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी जहाल हिंदुत्वाची शाल पांघरल्यानंतर येत्या ५ जून रोजी ते अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही मोठी घोषणा केली. दरम्यान त्यांच्या या अयोध्या दौऱ्यावर उलट-सुलट चर्चा केल्या जात आहेत. महाराष्ट्रातील जनतेनं देखील राज ठाकरेच्या नव्या भुमिकेवर मिश्र प्रतिसाद दिला आहे. पाहुया मनसेच्या अयोध्या दौऱ्याबाबत काय म्हणतेय मराठी जनता?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Apr 2022, 9:38 am
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी जहाल हिंदुत्वाची शाल पांघरल्यानंतर येत्या ५ जून रोजी ते अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही मोठी घोषणा केली. दरम्यान त्यांच्या या अयोध्या दौऱ्यावर उलट-सुलट चर्चा केल्या जात आहेत. महाराष्ट्रातील जनतेनं देखील राज ठाकरेच्या नव्या भुमिकेवर मिश्र प्रतिसाद दिला आहे. पाहुया मनसेच्या अयोध्या दौऱ्याबाबत काय म्हणतेय मराठी जनता?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम New Project (1)



काय म्हणाले राज ठाकरे?

'मशिदींवरील भोंगे हा धार्मिक नव्हे तर सामाजिक विषय आहे. भोंग्यांचा त्रास फक्त हिंदूनाच होतो असं नाही, सर्वांनाच हा त्रास होतो. त्यामुळे जर ३ मे पर्यंत मशिदीवरील भोंगे उतरले नाहीत तर जशास तसे उत्तर देण्यास देशभरातील हिंदू बांधवांनी तयार राहावं. आम्हाला देशात कोणत्याही प्रकारच्या दंगली नको आहेत, त्यामुळे तुम्ही शांततेत भोंगे काढून घ्या अन्यथा आम्ही दिवसातून पाच वेळा मशिदीसमोर हनुमान चालिसा वाजवणार,' असा इशारा राज ठाकरे यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत दिला. सोबतच त्यांनी येत्या ५ जून रोजी ते अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याची घोषणा केली.



















संजय राऊत यांच्या आरोपावर बोलणं टाळलं

शिवसेना नेते संजय राऊत यांनी 'हिंदू ओवेसी' असं म्हणत राज ठाकरे यांचा समाचार घेतला होता. याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता राज ठाकरे म्हणाले की, 'मी आता पुन्हा लवंड्यांवर बोलू इच्छित नाही.' दरम्यान, राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांबाबतच्या भूमिकेवरून मागे हटणार नसल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट केल्याने आगामी काळात मनसेचा पोलीस प्रशासनासोबत संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

संजय राऊतांची राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर टीका

"देवळात गेल्यावर प्रसाद मिळतो. काही लोक प्रसादासाठी देवळात जातात. आम्ही रणांगणावर जातो, गेलो देखील.....", असा टोला संजय राऊतांनी राज ठाकरे यांना लगावला. अयोध्या सगळ्यांची आहे. रामलल्ला सगळ्यांचे आहेत. जर कुणाला रामलल्लांची आठवण झाली असेल तर त्यांनी नक्की अयोध्येला जावं, असंही संजय राऊत म्हणाले.

आम्ही लवकरच अयोध्या दौऱ्याची तारीख जाहीर करु

दुसरीकडे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही आपल्या अयोध्या दौऱ्याची घोषणा केली आहे, परंतु अद्याप तारीख जाहीर केलेली नाहीय. यासंदर्भात बोलताना राऊत म्हणाले, "लवकरच आम्ही तारीख जाहीर करु. पण आमची यात्रा ही श्रद्धेची यात्रा आहे, राजकीय यात्रा नाही"

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज
ट्रेंडिंग